कोलकाता – जदयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी बिहार बाहेर ते एनडीएबरोबर निवडणुका लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले आहे.
ममता यांनी याबाबत म्हटले की, आताच नितीश कुमार यांच्या या वक्तव्याबद्दल माहिती मिळाली आहे. ते बिहारच्या बाहेर एनडीएबरोबर राहणार नाहीत. मी त्यांचे यासाठी अभिनंदन करते.
सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपा व टीएमसी यांच्यात कमालीचा तणाव वाढलेला आहे. जदयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्लीत होणा-या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचेही नितीश कुमार यांनी सांगितले होते. त्याबाबत ममता यांनी समाधान व्यक्त केले आहे.