नवी दिल्ली – ‘फणी’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला लोकसभा निवडणूक सुरु असताना दुसऱ्याकडे नैसर्गिक आपत्तीवरून राजकीय वादळ सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फणी चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यास पश्चिम बंगालमध्ये पोहचले आहेत. यावेळी केंद्र सरकारने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आढावा बैठकीचा प्रस्ताव ठेवला. परंतु, ममता बॅनर्जींच्या सरकारने हा प्रस्ताव धुडकावून लावला.
सूत्रांनुसार, ओडिशानंतर नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधेय आढावा बैठक घेऊ इच्छित होते. तसा प्रस्तावही ममता बॅनर्जी यांच्या सरकारपुढे ठेवण्यात आला होता. परंतु, सध्या राज्याचे सर्व अधिकारी निवडणूक कार्यात व्यस्त असल्यामुळे आढावा बैठक घेता येणार नाही, असे उत्तर पश्चिम बंगाल सरकारकडून देण्यात आले.
दरम्यान, फणी’ चक्रीवादळसंदर्भात माहिती घेण्यासाठी रविवारीही पंतप्रधान कार्यालयाने ममता बॅनर्जी याना दोन वेळा फोन केला. परंतु, त्या फोनवर आल्या नाही. मुख्यमंत्री ममता यांच्याशी चर्चा न झाल्याने अखेर मोदींनी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याशी फोनवर चर्चा केली.