नवी दिल्ली – शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे माजी आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राजीव कुमार यांचे अटकेपासून संरक्षण काढून घेतले असून सीबीआय कारवाई करण्यास स्वतंत्र असल्याचे न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केले. यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका बसला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सात दिवसानंतर लागू होणार आहे.
मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याप्रकरणावर सुनावणी केली. न्यायालयाचा आदेश सात दिवसानंतर लागू होणार असून राजीव कुमार जामिनासाठी अर्ज करण्यास स्वतंत्र असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राजीव कुमार यांना जामीन मिळाला नाहीतर तपास यंत्रणा त्यांना अटक करू शकतात.
Supreme Court vacates interim protection given to former Kolkata Police Commissioner Rajeev Kumar from arrest by CBI over his alleged role in destroying evidence in Saradha chit fund case. Court gives seven days to Rajeev Kumar to seek legal remedies. pic.twitter.com/qw9uphvpdQ
— ANI (@ANI) May 17, 2019
दरम्यान, राजीव कुमार यांच्यावर शारदा चिट फंड घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. तसेच राजीव कुमार तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे.