नवी दिल्ली -17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या वेळी 13 राज्यांत पुरुषांपेक्षा जास्त महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 2014 साली 11 राज्यात हे प्रमाण जास्त होते. तेव्हा आंध्र प्रदेशचे विभाजन झाले नव्हते. आताही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला आहे.
2014 साली केरळमध्ये 97 लाख महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा 1 कोटी 6 लाख महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तमिळनाडूत गेल्यावेळी 2 कोटी 7 लाख महिलांनी मतदान केले होते. यावेळी 2 कोटी 13 लाख महिलांनी मतदान केले.
आंध्र प्रदेशमध्ये यंदा महिला मतदाराचे प्रमाण 3 लाख 27 हजारांनी वाढले आहे. आंध्र प्रदेशनंतर बिहार, मणिपूर, मेघालय, पुद्दुचेरी, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोरम, दमण दीव आणि लक्षद्वीपचा क्रमांक लागतो. बिहारमधील आकडा हा सहा टप्प्यांपर्यंतचा आहे.