नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.
सांयकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी समोर आली असून, देशात सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण सरासरी 59.25 टक्के मतदान झाले आहे.
9 राज्यांतील मतांची टक्केवारी (दुपारी 5 वाजेपर्यंत)
बिहार – 53.67%
जम्मू आणि काश्मीर – 9.79%
झारखंड – 63.76%
मध्यप्रदेश – 65.86%
महाराष्ट्र – 51.28%
ओडिशा – 64.05%
राजस्थान – 62.93%
उत्तर प्रदेश – 53.12%
पश्चिम बंगाल – 56.47%
एकूण : 59.25%