मुंबई : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झाली. यावेळी भूकंप प्रवण क्षेत्रातील विकासकामांसाठी निधी वाटपाबाबत चर्चा झाली.
यावेळी समितीचे सदस्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शंभूराज देसाई, आमदार शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, आमदार सदानंद चव्हाण,आमदार शशिकांत शिंदे, समितीचे सचिव सुरेश खाडे आदी यावेळी उपस्थित होते.
समितीच्या शिल्लक निधीपैकी 20 कोटी निधींचा वापर भूंकप प्रवण क्षेत्रातील सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांसाठी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.