पुणे – मध्यरात्रीत कोंढवा तालाब कंपनीसमोर बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मोठी सीमाभिंत कोसळली. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे.
दरम्यान , याघटनेत एकाच घरातील चार जणांनाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मध्ये दीपरंजन शर्मा, नेव्हीयादेवी (पत्नी), रणजित आणि राहुल (मुले) यांचा समावेश आहे.