बर्मिंगहॅम : फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीनंतर गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. दरम्यान भारताकडून रोहित शर्माने केलेली 102 धावांची शतकी खेळी या पराभवाने व्यर्थ ठरली. तर, भारताच्या पराभवाने पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान डळमळीत झाले आहे.
महेंद्रसिंग धोनी याला या स्पर्धेत अपेक्षेइतका आक्रमक खेळ करता आलेला नाही. धडाकेबाज खेळाची त्याची क्षमता संपली आहे अशी टीका काही ज्येष्ठ खेळाडूंनी केली आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली याने त्याचीच पाठराखण केली आहे. तो म्हणाला धोनी व जाधव हे चौकार व षटकार मारण्याची प्रयत्न करीत होते. तथापि इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत त्यांना जखडून ठेवले होते. या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी 20-25 धावा जास्त दिल्या. त्यामुळेच आम्हाला सामना गमवावा लागला. अर्थात आजच्या सामन्यात आम्ही निश्चित विजयी होऊ व उपांत्य फेरीत स्थान मिळवू.