सोलापूर, (प्रतिनिधी) – मोहोळ तालुक्यातील शिंगोली येथील समाधान कस्तुरे यांच्यावर 15 मार्च रोजी गडचिरोली येथील लगाम गावात ऍसिड हल्ला झाला होता. पंचवीस दिवस त्यांच्यावर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा मृतदेह सोलापूरला आणण्यात आल्यानंतर गुरुवारी सकाळी
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
समाधान हे मागील दोन वर्षांपासून मुख्यमंत्री फेलोशिपअंतर्गत सामाजिक ग्रामपरिवर्तक या विभागाद्वारे गडचिरोली येथील लगाम ग्रामपंचायतीमध्ये काम करीत होते. दि. 15 मार्चच्या मध्यरात्री त्यांच्यावर ऍसिड हल्ला झाला. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप नातेवाइकांना सांगण्यात आले नाही. मात्र, गडचिरोली पोलिसांनी काहीना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.