नवी दिल्ली -साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अखेर टीकेचा ओघ वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी नमती भूमिका घेत माफीही मागितली आहे.
त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. भाजपाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी कैलाश सत्यार्थी यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली. पण प्रज्ञा सारखे लोक आत्मा, अहिंसा, शांतता, सहिष्णूता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. महात्मा गांधी हे सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडे होते. भाजपाने छोटया फायद्याचा मोह सोडून त्यांना तात्काळ पक्षातून काढून राजधर्माचे पालन करावे असे सत्यार्थी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
गोडसे ने गांधी के शरीर की हत्या की थी, परंतु प्रज्ञा जैसे लोग उनकी आत्मा की हत्या के साथ, अहिंसा,शांति, सहिष्णुता और भारत की आत्मा की हत्या कर रहे हैं।गांधी हर सत्ता और राजनीति से ऊपर हैं।भाजपा नेतृत्व छोटे से फ़ायदे का मोह छोड़ कर उन्हें तत्काल पार्टी से निकाल कर राजधर्म निभाए।
— Kailash Satyarthi (@k_satyarthi) May 18, 2019