नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून सर्वपक्षीयांनी प्रचारसभेचा धडाका लावला आहे. परंतु, प्रचारसभेत पुन्हा एकदा मोहम्मद अली जीना यांचे नाव आले आहे. भाजपाची साथ सोडत काँग्रेसवासी झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मोहम्मद अली जीना यांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे वक्तव्य केले आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले कि, काँग्रेस हे कुटुंब महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना, जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांचे आहे. यांचा देशाच्या प्रगतीत आणि स्वातंत्र्यात मोठा वाटा आहे. म्हणूनच मी येथे (काँग्रेसमध्ये) आलो आहे. मी काँग्रेस पक्षात पुन्हा मागे जाण्यासाठी आलेलो नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
#WATCH Shatrughan Sinha, Congress in Chhindwara, MP: Congress family from Mahatma Gandhi to Sardar Patel to Mohd Ali Jinnah to Jawaharlal Nehru…it's their party, they had the most important role in development & freedom of the country. This is the reason I've come here. (26.4) pic.twitter.com/HJg3EV8rNE
— ANI (@ANI) April 27, 2019
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तर या मतदारसंघातून भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे