जामखेड (प्रतिनिधी) – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन, समाजातील वेगवेगळे घटक, व्यक्ती मदतीसाठी पुढे आले आहेत. लॉकडाऊन काळात माणुसकी धर्म पाळत येथील उदयोजक रणजित नलवडे व राहुल घोरपडे या दोन तरुणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगारावर मोठे गंडांतर आले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेत सुमारे १०१ जणांना किराणाचे वाटप करण्यात येणार आहे यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले जात आहे.
संपूर्ण जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. या परिस्थितीत गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांना उदरनिर्वाह करताना कसरत करावी लागत आहे. रोज कमावून खात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या परिसरातील एकही नागरिक भूकेल्या पाेटी झाेपू नये म्हणून. या गरीब व गरजू १०१ कुटुंबीयांना नेहमी समाज कार्यात अग्रेसर असलेले कर्जत येथील उदयोजक रणजित नलवडे व युवा नेते राहुल घोरपडे यांच्याकडून किराण्याचे किटचे वाटप होणार असून वाटप करण्यात येणाऱ्या किटमध्ये तांदूळ, तूरडाळ,मसूरडाळ, तेल, शेंगदाणे ,साखर, पीठ आणि मीठ आदी जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे.