आसाम – आसामच्या बारपेडा जिल्ह्यात तीन मुस्लीम तरुणांना जय श्रीराम न म्हटल्यामुळे मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या बारपेडा जिल्ह्यात फखरुद्दीन अली अहमद मेडिकल कॉलेजजवळ शुक्रवारी चार बाईकस्वार पोहचले रकीबुल हक तसेच कुर्बान खान आणि बुरान मुस्लिम तरुणांना यांना शिवीगाळ करू लागले आणि त्यानंतर त्यांना मारहाण आणि श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणाही द्यायला सांगितल्या. या प्रकरणाचे स्थानिक पोलीस तपास करत असून या प्रकरणातील दोषींना लवकरच अटक करणार असून, योग्य शिक्षा दिली जाईल, असे स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे.
तत्पूर्वी, झारखंडमधील खरसावन जिल्ह्यात तरबेज अन्सारी या 24 वर्षीय तरुणाला जमावाकडून मारहाण झाली आहे. या मारहाणीत तरबेज अन्सारी या तरुणाचा मृत्यू झाला होता. जय श्रीराम न म्हटल्यानं मुस्लिम तरुणांना मारहाण करण्याचं पुन्हा एक प्रकरण समोर आल्यामुळे असदुद्दीन ओवैसींनी या प्रकरणावरून संघावर टीका केली होती.