नवी दिल्ली – मोदी सरकारचे दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प येत्या पाच तारखेला सादर करणार आहे. मात्र त्याआधीच सरकारने खरीप पिकांच्या आधारभूत दरात वाढ जाहीर केली.
मंत्रिमंडळाच्या समितीने जाहीर केलेल्या माहितीनुसार तांदळाच्या आधारभूत दरात 3.7 टक्के वाढ करून तो 1815 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमार यांनी सांगितले की, ज्वारीचा आधारभूत दर 120 रुपयांनी तर रागीचा आधारभूत दर 253 रुपयांनी वाढविण्यात आला. तुरीचा आधारभूत दर 215 रुपयांनी, मुगाचा आधारभूत दर 75 रुपयांनी, उडीदाचा आधारभूत दर 100 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. शेंगदाण्यांचा आधारभूत दर 200 रुपयांनी तर सोयाबीनचा आधारभूत दर 311 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. मध्यम कापसाचा दर 105 रुपयांनी तर लांब कापसाचा दर 100 रुपयांनी वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढविण्यासाठी कृषी उत्पादनांच्या आधारभूत दरात वाढ करण्यात येत आहे.