कोल्हापूर – भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत वर्ल्ड कप मधील क्रिकेट सामना जिंकला. या क्रिकेट सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलं होतं. भारताने पाकिस्तानचा सपशेल धुवा उडाल्यानंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी मध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
कोल्हापूरच्या शिवाजी चौकात आणि इचलकरंजीच्या जनता चौकात हजारो युवक भारताचा तिरंगा घेऊन एकत्र आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आणि भारताचा तिरंगा डौलाने फडकवत भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं तर काहींनी डॉल्बीच्या तालावरती डान्स करत आनंद व्यक्त केला.
तर या दोन्ही ठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. भारताने पाकिस्तान सोबत हा सामना जिंकल्यामुळे वर्ल्ड कप रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.