मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना यांचा मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. त्यामुळे यंदाही सलमाने आपल्या चाहत्यांसाठी चांगलीच भेट दिल्याचे दिसून येते. ‘भारत’ चित्रपटाने बुधवारी तब्बल ४२.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे या वर्षात प्रदर्शनाच्या दिवशीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘भारत’ अग्रस्थानी आहे.
#Salmania grips the nation… #Bharat storms the BO… Proves *yet again* Salman Khan is the biggest crowd puller… #Bharat opens much bigger than Salman – Ali Abbas Zafar’s #TigerZindaHai [₹ 34.10 cr] and #Sultan [₹ 36.54 cr]… Wed ₹ 42.30 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2019
‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. हा चित्रपट हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत देखील रिलीज झाला आहे.