लंडन – दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे मनौधैर्य उंचावलेल्या भारतीय संघाची बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आज ओव्हल मैदानावर गाठ पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपराजित्व राखण्याकरिता भारताकरिता ही लढत महत्वाची आहे. तर दुसरीकडे पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. तसेच ऑस्ट्रेलिया यंदाच्या स्पर्धेत अफगाणिस्तान व त्यापाठोपाठ वेस्ट इंडीजविरूध्द विजय मिळवून आपले इरादे स्पष्ट केले आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#TeamIndia Captain @imVkohli wins the toss and elects to bat first against Australia.#CWC19 pic.twitter.com/9YDIqxQT4a
— BCCI (@BCCI) June 9, 2019