मॅंचेस्टर – भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढत एखाद्या धर्मयुध्दासारखीच खेळली जाते. अंतिम सामन्यापेक्षाही या लढतीबाबत कमानीची उत्कंठा असते. आज येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील सामनाही त्यास अपवाद नाही.
भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विश्वचषकामध्ये एकमेकांना भिडणार असल्याने क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा सामना म्हणून येथे चाहत्यांमध्ये भलाताच उत्साह दिसून येत आहे. या सामन्याचे वेळी पावसाच्या व्यत्ययाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असली तरीही तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. अतिशय चढ्या भावाने त्याची विक्री होत आहे. चाहतेही वाटेल ती किंमत मोजण्यासाठी मागेपुढे पाहत नाही असे चित्र येथे पाहावयास मिळत आहे.