मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्याला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
दरम्यान, रोहित आणि केएल राहुलनं संयमी सुरुवात केली आहे. रोहित शर्मा पाठोपाठ भारतीय सलामीवीर के.एल. राहुलने देखील 70 चेंडूत आपलं अर्धशतक साजर केलं आहे. त्याआधी रोहित शर्माने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.
FIFTY!@klrahul11 joins the party, brings up a well made half-century 💪💪🇮🇳 pic.twitter.com/nS3m7kzXAy
— BCCI (@BCCI) June 16, 2019
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 24 षटकांत 1 बाद 136 धावा झालेल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर रोहित शर्मा 65 चेंडूत 75 वर खेळत आहे. तर के एल राहुल 78 चेंडूत 57 धावा करत बाद झाला आहे. विराट कोहली नुकताच फलंदाजीसाठी मैदानावर आला आहे.
Match 22. 23.5: WICKET! KL Rahul (57) is out, c Babar Azam b Wahab Riaz, 136/1 https://t.co/GuJZFwzObH #IndvPak #CWC19
— BCCI (@BCCI) June 16, 2019