रायबरेली – गेल्या 70 वर्षात नोटबंदी किंवा गब्बरसिंग टॅक्स लागू करण्यासारखा मुर्खपणा कोणत्याहीं सरकारने केला नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे बोलताना केले. ते आज येथे रायबरेली मतदार संघातील उंचहर येथील प्रचार सभेत बोलत होते. गेल्या 70 वर्षांच्या काराभाराचा उल्लेख करून मोदी कॉंग्रेसवर सातत्याने टीका करीत आहेत त्याला उत्तर देताना राहुल यांनी यानी 70 वर्षात नोटबंदीसारखा मुखर्पणा कोणी केला नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. चोैकीदाराच्या चुकीच्या कारभारामुळे आणि स्थानिक उद्योगांची वाट लागली असून लोकांच्या नोकऱ्याहीं या चौकीदारामुळेच गमावल्या गेल्या आहेत असा आरोप त्यांनी केला. सरकारी सेवांमध्ये आज 22 लाख जागा रिकाम्या आहेत.
निदान त्या जागाभरून तरी मोदी युवकांना रोजगार देऊ शकले असते पण त्यांनी तेहीं केले नाही कारण त्यांना युवकांना सरकारी नोकरीच मिळू द्यायची नव्हती असे ते म्हणाले. मोदींनी लोकांच्या खिशातून पैसे काढून ते नीरव मोदी, मेहुल चौकसी, अनिल अंबानी अशा लोकांना दिले आणि हे लोक पैसे बुडवून पळून गेले. त्यांच्याकडून पैसा वसुल करून हे पैसे आम्ही लोकांना देऊ असेही त्यांनी नमूद केले.÷