सातारा – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी बाजी मारत जवळपास 1 लाख पेक्षा जादा मतांनी विजयी मिळविला आहे. तर दुसरीकडे राज्यात जनता दुष्काळामध्ये होरपळत आहे. या भीषण दुष्काळाचे भान ठेवून उदयनराजे भोसले यांनी ‘मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही.’ असे ट्विट केले आहे.
सातारा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे उदयनराजे भोसले यांनी विजयाची हॅट्रिक मिळवली. मात्र, शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी त्यांच्यासमोर चांगले आव्हान उभे केल्याने उदयनराजे समर्थकांच्या सर्वाधिक मताधिक्याच्या स्वप्नावर पाणी पडले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड राखण्यात यश आले. या विजयासाठी त्यांनी जनतेचे, कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले. यावेळी विजयाचा सातारा येथे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. मात्र दुष्काळाचे भान ठेवून उदयनराजे भोसले यांनी ‘माझं राज्य दुष्काळात असताना मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही.’ असे ट्विट केले असून समर्थकांना राज्यातील दुष्काळाची आठवण करून दिली.
माझं राज्य दुष्काळात.
मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही.
– श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. pic.twitter.com/bVpxxMjz6M— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) May 23, 2019