नवी दिल्ली – भारतामध्ये मुस्लिमांचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही देशात भाडेकरू नाहीत, असे वक्तव्य एमआयएमचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ते शुक्रवारी दिल्लीतील एका सभेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना असुदुद्दीन ओवैसी म्हणाले कि, भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकल्या म्हणजे आम्ही देशात मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. भारतीय राज्यघटनेचा हवाला देत मी पंतप्रधानांना इतकेच सांगू इच्छितो की, असुदुद्दीन ओवैसी हा हक्कासाठी तुमच्याशी लढत राहील.
Asaduddin Owaisi, AIMIM: Hindustan ko aabad rakhna hai, hum Hindustan ko aabad rakhenge. Ham yahan par barabar ke shehri hain, kirayedaar nahi hain hissedar rahenge. https://t.co/kiu7wFIx59
— ANI (@ANI) June 1, 2019
मस्जिदवरून ते म्हणाले, भारताच्या राज्यघटनेने आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची मुभा दिली आहे. जर देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आम्हालादेखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे. आम्हाला हिंदुस्थानाला समृद्ध ठेवायचे आहे आणि आम्ही ते जरूर करु. मात्र, या देशात आमचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही भाडेकरू नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.