नॉटिंगहॅम – यंदाच्या विश्वचषकात तब्बल तीन सामने पावसामुळे वाया गेल्याने आयसीसीच्या टाईम टेबलवर टिका होत असतानाच या सामन्यांसाठी अतिरिक्त दिवस (रिजर्व्ह डे) का ठेवण्यात आला नाही? असा प्रश्न अनेक जणांनी विचारला. मात्र, प्रत्येक सामन्यासाठी अतिरिक्त दिवस ठेवणे हे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण आयसीसीने दिले आहे.
पहिल्या विश्वचषका पासुन ते 2015 साल पर्यंतच्या विश्वचषकापर्यंत केवळ दोन सामने रद्द करण्यात आले होते. तर, यंदाच्या विश्वचषकात एकुण तीन सामने रद्द करण्यात आल्याने सगलीकडूनच आयसीसीवर टिका केली जात आहे. यंदाच्या विश्वचषकात दोन सामने एकही चेंडू न ताकता तर एक सामना 8 षटकांचा खेळ झाल्यानंतर रद्द करण्यात आला. यावेळी बोलताना आयसीसीने स्पष्ट केले की, विश्वचषक स्पर्धा ही फार मोठी स्पर्धा असुन ही स्पर्धा रोज सामने असुनही साधारण दोन महिण्यांच्या आस पास चालेल. एवढ्या मोठ्या वेळापत्रकात प्रत्येक सामन्यासाठी अतिरिक्त दिवस ठेवणे हे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले आहे.