लखनौ – बहुजन समाज पक्षाला युती नको असेल तर आम्हीही विधानसभेच्या पोटनिवडणुका स्वबळावर लढू असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
आमचे मार्ग वेगळे झाले असतील तर आम्ही त्याचे स्वागतच करतो असे ते म्हणाले. बहुजन समाज पक्षाच्या नेत्यांवर टीका करणे मात्र त्यांनी टाळले. त्यांना युती नको असेल तर आमचीही स्वबळाची तयारी असल्याने त्यांनी नमूद करीत अखिलेश यांनीही उत्तरप्रदेशातील राजकारणात एकट्यानेच पुढील वाटचाल करण्याचा संदेश दिला आहे.
उत्तरप्रदेशातील नऊ आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने आणि अन्य दोन जागा रिक्त झाल्याने एकूण अकरा जागांवर आता केव्हाही निवडणुका होऊ शकतात. त्याच्या आधीच दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट करीत स्वबळाचा नारा दिला आहे.