ललितपूर – उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर जिल्ह्यात भाजपा आमदार रामरतन कुशवाहा यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना बुटांनी मारा असे वादग्रस्त विधान केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाला संबोधित करताना रामरतन कुशवाहा महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही इशारा देत म्हणाले, ‘2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या पार्टीचं सदस्यता घेण्यासाठी दबाव बनवला आहे. कार्यकर्त्यांच्या योग्य मतालाही अधिकारी किंमत देत नाहीत. रामरतन कुशवाहा यांच्या विधानावरून राज्यमंत्री मनोहर लाल पंथ आणि खासदार अनुराग शर्मा यांनी हात झटकले आहेत.’