नॉटिंगहॅम: भारत आणि न्युझीलंड दरम्यान होत असलेल्या विश्वचषकातील आठराव्या सामन्याला पावसाच्या आडकाठीने अद्याप सुरूवात झाली नसुन सामन्यात टॉसही होवू शकलेला नाही. मात्र, मैदानावर पावसातही चाहते सामना होण्याच्या आशेने थांबून होते. मात्र, पंचांनी मैदानात येत सामना रद्द झाल्याचे घोषीत करत दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुन बहाल केला आहे.
दरम्यान, पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती, मात्र, बराच काळ सामन्याला सुरुवात झाली नव्हती त्यामुळे सामना होईल की नाही या बाबत साशंकता निर्माण झाली होती. तत्पूर्वी, पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने विश्वचषकात सकारात्मक सुरुवात केली आहे. पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना आहे.