नवी दिल्ली – आयपीएलचा हंगाम पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष अता विश्वचषक स्पर्धे कडे असुन भारतीय संघ या स्पर्धेत विजतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचे कौतुक केले असुन सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामीची जोडी सर्वोत्कृष्ट जोडी असल्याची पोच पावती त्यांनी दिली आहे.
विश्वचषक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय संघाची मदार असणार आहे असेही त्यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. या दोन्ही खेळाडूंनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक महत्वाचे सामने जिंकले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.