नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर देशातील ५ करोड लोकांना ७२ हजार रुपये वर्षाला दिले जातील, असे आश्वासन दिले होते. न्यूनतम आय योजना (न्याय) नुसार हे रुपये दिले जातील. असे गांधींनी म्हटले होते. मात्र यानंतर राजकीय वर्तुळात हल्लाबोल होत आहे.
भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सत्ताधारी यावर प्रश्न निर्माण करत आहेत. काँग्रेस एवढा बजेट आणणार कुठून ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, वर्षाला ७२ हजार म्हणजेच महिन्याला ६ हजार कशे देणार, हे सांगण्यासाठी काँग्रेसने आपल्या सोशल साइट्सवर एक मोबाईल नंबर दिला आहे. यावर माहिती दिली आहे.