पिंपरी – लग्नामध्ये मानपान केला नाही, तसेच घरातील वस्तूही दिल्या नाहीत या कारणांवरुन विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात विवाहितने फिर्याद दिली असून पती व सासरकडची मंडळी 2009 पासून शारीरिक व मानसिक छळ करत होती.
ही घटना थेरगाव, ताथवडे येथे 2009 पासून ते गुन्हा दाखल होईपर्यंत घडली. याप्रकरणी विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन समाधान लोंढे, सासरे बाबासाहेब लोंढे, सासू इंदूबाई लोंढे, दिर विकास लोंढे, नणंद अर्चना कांबळे, नंदप्रकाश कांबळे (सर्व रा. शिवतीर्थ नगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फर्यादी महिलेचे 2009 साली लग्न झाले आहे. मात्र, लग्न झाल्यापासून लग्नामध्ये मानपान केला नाही, तसेच घरातील वस्तुही दिल्या नाहीत, असे म्हणून सतत शारिरिक व मानसिक छळ केला. तसेच वेळो-वेळी लाथाबुक्क्याने मारहाण केली.