नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत उत्पन्नाच्या तुलनेत सरकारचा खर्च वाढल्यामुळे या दोन महिन्यांत वर्षासाठी ठरविलेल्या तुटीपैकी 52 टक्के तूट आताच झाली आहे.
अंतरिम अर्थसंकल्पात या वर्षी सरकारने तूट 7.03 कोटी रुपये राहील असे ठरविले होते. मात्र पहिल्या 2 महिन्यातच ही तूट 3 लाख 66 हजार 157 कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे सरकारला आगामी काळात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.