मुंबई: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारने गाजावाजा करत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना आणली. मात्र ही योजना फसवी निघाल्याचे म्हटले आहे. हाच का शेतकऱ्यांचा सन्मान? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, सकारची जुमलेबाजी आज पुराव्यानिशी सभागृहात उघड केली. ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र वाटत कर्जमाफी झाल्याचा बोलबाला केला त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच नाही. वाशिमचे अशोक मनवर या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले. २ वर्षे उलटून गेली कर्जमाफी झाली नाही तसे निवेदन त्यांनी दिले. राज्यात असे लाखो शेतकरी आहेत ज्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र तर दिले पण कर्जमाफी नाही. सरकारची कर्जमाफी फसवी आहे हे पुन्हा सिद्ध झाले.