नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून किमान 90 हजार कोटी रुपये उभे करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. त्यासाठी बंद असलेल्या सरकारी कंपन्यांची जमीन आणि इमारती विकल्या जाणार आहेत.
त्याकरिता अर्थमंत्रालयाने सल्लागार नेमण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या सल्लागार कंपन्या अर्थ मंत्रालयाला योजना सादर करणे अपेक्षित आहे. यावर्षी सरकार आक्रमकपणे निर्गुंतवणूक करणार आहे.