नवी दिल्ली – श्रीलंकेत बुरखाबंदीनंतर भारतातही अशी बंदी करण्याची मागणी काही जणांकडून करण्यात येत आहे. यानंतर रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असे म्हणत शिवसेने देखील बुरखाबंदीबाबत भाष्य केले होते. मात्र यावर देशभरात काही ठिकाणी याचे समर्थन तर काही ठिकाणी विरोध दर्शवला जात आहे. अशातच केरळमधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी (एमईएस) ने विद्यालयातील मुलींना नकाब परिधान न करण्याचा आदेश दिला आहे.
Kerala: Muslim Education Society (MES) has issued a circular banning girl students from covering their faces in colleges.
— ANI (@ANI) May 2, 2019
दरम्यान, इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत मुस्लिम महिलांना बुरख्याने चेहरा झाकून घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी त्यांनी चेहरा पुर्ण दिसेल अशाच स्थितीने बुरखा घालावा असा स्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानंतर भारतात देखील स्त्रियांच्या बुरखा घालण्यावर बंदी घालावी यावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र केरळ मधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने आधुनिकता आणि धर्म यांचा मिलाप करणे गरजेचे असल्याचे सांगत मुलींना नकाब परिधान न करण्याचे आदेश दिले आहेत.