बस अपघातात 10 जणांचा मृत्यू
रांची – झारखंडहून बिहारला जाणाऱ्या बसला अपघात झाल्याने 10 भाविकांचा मृत्यू, तर 23 जण जखमी झाले आहेत. हे भाविक एका खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. झारखंडमधून बिहारला जात असताना चंपारणमधील जीटी रोड घाटीजवळ सोमवारी पहाटे हा अपघात झाला.
हा अपघात हजारीयाबाग जिल्ह्यातील महामार्गावर ट्रक आणि बस यांच्यात धडक झाल्याने घडला. ही धडक इतकी भीषण होती की, आठ जणांना जागीच मृत्यू झाला, तर दोन भाविकांना उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 7 पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतीला सुरूवात केली.
अपघातामध्ये मृत्यू पडलेल्या भाविकांमध्ये बिहारच्या भाविकांची संख्या जास्त आहे. गंभीर जखमी भाविकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, बसमध्ये काही प्रवासी अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.