मुंबई – शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. आणि भारत विश्वचषकातून बाहेर पडला. अशातच भारतीय संघाचे पाठिराखे निराश असले तरी ट्विटरवरील खोचक टिकाना सडेतोड उत्तर देत आहे. यात अनेक क्रिकेटप्रेमी राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारही टीम इंडियाचे समर्थन करून क्रिकेटप्रेम व्यक्त करत आहे.
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टशिस्ट आमिर खान ट्विट केले आहे की,’विराट आज आपल्यासोबत नशीबाची साथ नव्हती. माझ्यासाठी तर भारताने तेव्हाच विश्वचषक जिंकले होते जेव्हा भारताने उपांत्य फेरीमध्ये स्थान पटकावले होते. सामन्यात तू खूप मस्त खेळलास. जर काल पाऊस पडला नसत. तर कदाचित आज परिस्थीती काही वेगळी असती. पण खूप छान खेळलात. तुम्हा सर्वांचा आम्हाला अभिमान आहे.’