पुणे – गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी पारा 40 च्या पार पोहचला होता. त्यामुळे अनेकजण आतुरतेनं पावसाची प्रतीक्षा करताना दिसत होते. पण अखेर ही प्रतीक्षा संपली आहे, कारण काल 7 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागानं केली आहे. तसेच हा मान्सून हळूहळू पुढे सरकेल अशी देखील माहिती हवामान विभागंन दिली आहे.
दोन दिवस अगोदरच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानं बळीराजा तसेच उकाड्यांनी हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात देखील पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून दाखल होईल, अशी देखील माहिती हवामान विभागांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान मान्सून दाखल होण्याआधी वर्धा, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या.