नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.
दरम्यान, व्हीव्हीपॅटच्या मोजणीसंदर्भात सुमारे 21 पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी नामांकित वृत्त माध्यमांना दिलेल्या मुलाखती आपले मत व्यक्त केले आहे कि,’ हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.