दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता व्याकूळ
वाघापूर – सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचे प्रत्यंतर सर्वांनाच आले. लग्नाची निमंत्रणांसह विविध उत्पादने, कृषी उत्पादने, उद्योग, व्यवसाय यांची माहिती सोशेल मीडियावर नेहमीच पाहत आहोत. यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला असून, सर्वत्र टंचाईने शेतकरी आणि सर्वसामान्य जनता व्याकूळ झाली आहे आणि मग यातूनच आता वरूणराजालाही सोशेल मीडियाद्वारे आळवणी घातली जात असून “मित्रा, आता फक्त आस तुझ्या आगमनाची…’, अशा प्रकारच्या पोस्ट येत आहेत.
शेतकऱ्यांच्या काळजाला भिडणारी ही पोस्ट असल्याने या एका पोस्टने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना पिण्यास पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही, त्यातच आता खरीप हंगाम आला आहे, गावागावांत जलसंधारणाची कामे झाली आहेत. वृक्षरोपण करण्यासाठी हजारो खड्डे खोदले आहेत. शेतकऱ्यासह जनावरे, पक्षी, प्राणी, वृक्ष अशी संपूर्ण सृष्टी आपली मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळे वरुणराजा, आता तू आमचा अंत पाहू नकोस, लवकरात लवकर या पृथ्वीवर ये आणि आम्हाला या दुष्काळातून सोडव…, अशी कळकळीची विनवणी करण्यात आली आहे.
या विनवणीकडे बळीराजा समोरील एक भले मोठे झाड, झाडावर बसण्यासाठी निघालेला एक पक्षी आणि झाडाखाली बांधलेली गाय मोठ्या व्याकूळ नजरेने बघत आहे. तर वरुणराजा सुद्धा या सर्वांकडे पाहून मिश्किलपणे हसत आहे, मी लवकरच येत आहे, तू काळजी करू नकोस, असेच सांगत असल्याचा भास होत आहे. पोस्ट लहान असली तरी त्याचा आशय फार मोठा आहे, हेच या चित्रातून दिसून येत आहे.
All of us.. every Indian!
Waiting for #Monsoon pic.twitter.com/OFoiCtxhRk— Rohit Khilnani (@rohitkhilnani) June 8, 2019
First proper monsoon downpour is happening right now, south of Thiruvananthapuram!
Ya, monsoon is here! #monsoon pic.twitter.com/kQNEAUDhcl
— 👀 (@gbenhur) June 7, 2019
#Monsoon on its way! pic.twitter.com/53IRWjucis
— Anagha Paranjape-Purohit (@anaghapp) June 2, 2019