चाळीसगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज चाळीसगाव येथे झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. भाजपाने देशापुढे सर्व बाजूने जनतेला लुटण्याचा एक नवा धडा मांडला. मोदींच्या नाकर्तेपणाच्या मुद्द्यांचा विचार निवडणुकीत मतदान करण्याआधी करावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार मनिष जैन, माजी आमदार ईश्वर जाधव, राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, निरीक्षक करण खलाटे, उमेश नेमाडे, रामचंद्र जाधव, ज्ञानेश्वर माळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात शिवसेनेने कितीही आकांडतांडव केले तरी त्याचा उपयोग नाही. पाच वर्षे मोदींवर टीका करणारे उद्धव ठाकरे अचानक मोदींना मिठी कसे मारायला लागले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपण बूथ कमिटीवर जोर देण्याची गरज आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसोबत विधासभेत पक्षाच्या जागा नक्कीच वाढतील, यामध्ये बुथ कमिट्यांचा मोठा सहभाग असेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यात शिवसेनेने कितीही आकांडतांडव केले तरी त्याचा उपयोग नाही. पाच वर्षे मोदींवर टीका करणारे @uddhavthackeray अचानक मोदींना मिठी कसे मारायला लागले? – @Jayant_R_Patil #NCP2019 #LoksabhaElections2019 @narendramodi @BJP4India pic.twitter.com/3ZlKfH049W
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 15, 2019