मुंबई: बालभारतीने इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील संख्यावाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक असा बदल केला. त्यानंतर मराठीतील जोडाक्षरे मोडीत काढून आता मावशीला आई बहीण म्हणायचे का, असा सर्वसामान्य जनतेकडून विचारण्यात आलेला प्रश्न विधानसभेचे सदस्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
जोडाक्षरे संपवून नव्या पिढीला समृद्ध करत आहेत की मराठी भाषेची गळचेपी करत आहेत. हे आधी भाजप सरकारने स्पष्ट करावे, असे आव्हाड यांनी सांगितले. नवीन पद्धतीने शिक्षकांनी शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार आहे. त्यामुळे भाजप सरकार भाषेच्या माध्यमातून नवी पिढी समृद्ध करण्याऐवजी उद्ध्वस्त करत आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.