बर्मिगहॅम : विश्वचषक स्पर्धेतील आजच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 338 धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा सामना करताना भारतातर्फे रोहित शर्माने शानदार शतक झळकवले तर कर्णधार विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी केली. मात्र अखेरच्या षटकांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे भारताला निर्धारित 50 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 307 धावांपर्यंतच मजल मारता आली. यामुळे इंग्लंड हा सामना 31 धावांनी जिंकला.