कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दख्खनचा राजा जोतिबाला प्रदक्षिणा घातले साकडे
कोल्हापूर: राज्यातील दुष्काळ संपवा म्हणून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज दख्खन चा राजा जोतिबाला साकडं घालण्यात आलं आहे. कोल्हापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 हुन अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
राज्यातील दुष्काळ नष्ट होऊ दे त्याचबरोबर देशात शेतकऱ्यांचे दुःख समजून घेणारं काँग्रेसचे सरकार येऊ दे अशी मागणी करत काँग्रेसच्या वतीने दख्खन चा राजा जोतिबाला आज साकडे घालण्यात आले. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आज जोतीबाचे दर्शन घेऊन ही मागणी केलीय. गरीब,कष्टकरी, शेतकऱ्यांचा कुलदैवत असलेल्या जोतिबा आमची प्रार्थना पूर्ण करेल असा आशावाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या