नवी दिल्ली – भाजपा सरकारने केंद्रात सत्तेत येताना दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करू, असे आश्वासन दिले होते. त्यावरून विरोधकांनी नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असा आरोप केला. मग रोजगारांचे झाले काय, असा सवाल विरोधकांकडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विचारला जाऊ लागला. त्यावर नितीन गडकरी यांनी भाष्य केले.
गडकरी यांनी सांगितले की, दोन कोटी रोजगार तर फक्त त्यांच्या मंत्रालयाने दिले आहेत. माझ्या विभागाने 17 लाख कोटींची कामे दिली आहेत, ती भारत सरकारच्या बजेटपेक्षा अनेक पट जास्त आहे. दोन कोटी रोजगार तर फक्त माझे खातेच देत आहे. त्याचे आकडे आहेत. ई-रिक्षा पाहा. एक कोटी लोक हातरिक्षा चालवत होते, हा रोजगार नाही का? दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले की, ई-रिक्षामुळे रोजगार मिळाल्याने गुन्हे घटले असेही गडकरींनी सांगितले.