महावितरणकडून पावसाळा पूर्व दुरुस्तीकडे दुर्लक्ष
नगर: मान्सून सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले होते. परंतु महावितरण विभाग यापासून अलिप्त राहिला आल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले असून, लाइन खालची झाडे तशीच असल्याने विद्युत वाहक तारा येकत्र झाल्याने विजेचा खेळ खंडोबा झाला आहे. तसेच अनेक ठिकानी विद्युत वाहक तारा तुटल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीचा आढावा घेतला होता. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संबंधित प्रशासन यांना पावसाळ्यापूर्वी आपत्तीची पूर्वनियोजित कामे 31 मे पर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु ही कामे झाली नसल्याने महावितरण विभागचा भोंगल कारभार पहिल्या पावसात दिसून आला आहे.
शहरास अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी 5 ते सहा तास वीजपुरवठा खंडित झाला होता.