भारत-रशिया मैत्री सामान्य माणसापर्यंत
पुणे, दि. 08 – 1917 साली रशियात समाजवादी क्रांती झाली. भारतीय नेत्यांना रशियाविषयी कुतूहल वाटत होते. 1946 साली भारत-रशिया सहकार्याला सुरुवात झाली. आज भारताचा “आर्यभट्ट’ हा उपग्रह अवकाशात फिरतो आहे. भारत-रशिया मैत्रीचीच फलश्रूती आहे. काश्मीर प्रकरणी रशियाने सतत भारताची बाजू घेतली. ही मैत्री केवळ सरकारी पातळीवर राहिली नसून सामान्य माणसापर्यंत पोहाचली आहे. असे मत शांता रानडे यांनी वसंत व्याख्यानमालेत “भारत-रशिया सहकार्य’ या विषयावर बोलताना काढले.
कोकणीला मान्यता देण्यामागे राजकारण
पुणे – कोकणीला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता देण्याच्या साहित्य अकादमीच्या निर्णयाने कुठेतरी एक राजकीय विचार केला आहे. तो मला अप्रस्तूत वाटतो, अशी स्पष्ट भूमिका साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी “कोकणी आणि साहित्य अकादमीचा निर्णय’ या विषयावर बोलताना मांडली. पु. ल. पुढे म्हणाले, मराठीच्या उपभाषा स्वतंत्र आहेत असे मानायचे आणि हिंदीच्या उपभाषा मात्र हिंदीच आहेत असे मानायचे ही साहित्य अकादमीची भूमिका बरोबर नाही. कोकणीला स्वतंत्र भाषा म्हणून मान्यता देण्यामागे राजकारण आहे.