चिंबळी – गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरूवात केली असल्याने भात रोपे तरारली आहेत. खेड तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरात शेतकरी वर्गाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी भात लागवड करण्यासाठी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी शाळी टाकून भातरोपे तयार केली. मध्यंतरी काही काळ पावसाने ओढ देऊन उष्णता निर्माण होऊन ढगाळ वातावरण झाल्याने रोपे पिवळी पडली होती.
मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझिम व कधी जोरदार पावसाने सुरूवात केली असल्याने भात रोपे हिरवी गार होऊन तरारली असल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.