मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे भाजपच्या गटात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे डाॅ. अमोल कोल्हे यांनी एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. अमोल कोल्हे म्हणाले, एक्झिट पोल आणि निकाल यात मोठी तफावत असते, त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ शकते, पण निकाल हा अखेर असणार आहे.