नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावत, सर्वोच्च न्यायालयाने देशात तुम्हाला शांतता नको आहे का? असा प्रतिप्रश्न करत याचिकाकर्त्यावर जोरदार ताशेरे ओढले.
पंडित अमरनाथ मिश्रा यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मिळावी याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याना देशात शांतता राहावी असे तुम्हाला वाटत नाही का? असे विचारले. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत पंडित अमरनाथ मिश्रा यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने देखील ही याचिका फेटाळून लावत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.