रतलाम – भोपाळ मधून सध्या लोकसभेची निवडणूक लढवणारे दिग्विजयसिंह यांनी आपल्या राघवगड गावात जाऊन यावेळी मतदान केले नाही. त्यावरून मोदींनी त्यांना येथील सभेत घेरण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाली की लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाला फार मोठे महत्व असते.
अगदी राष्ट्रपती सुद्धा मतदानाचा हक्क बजावतात. मीही गुजरातला जाऊन मतदान करून आलो पण दिग्विजयसिंह यांना मतदानाला वेळ मिळाला नाहीं हे लोकशाहींतील मोठे पाप आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दिग्गीराजाला लोकशाहीची आणि लोकांची पर्वाच नाही अशी टीकाही त्यांनी येथील सभेत बोलताना केली. दिग्गीराजांनी नर्मदा यात्रा केली. पण तरीही त्यांना यावेळी पराभवापासून कोणीही वाचवू शकत नाही अशी टिपण्णीही मोदींनी यावेळी केली.