भोपाळ – लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे संपले आहेत. सगळेच पक्ष आपलाच उमेदवार विजयी व्हावा अशी प्रार्थना करत असतानाच कॉंग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनासाठी महामंडलेश्वर स्वामी वैराग्यनंदही पुढे सरसावले आहेत. दिग्विजयच विजयी व्हावे यासाठी त्यांनी मिरची हवन सुरू केले आहे. हे हवन 25 तारखेपर्यंत सुरू असणार आहे.
दिग्विजयच साधू संतांची काळजी घेतात. त्यांच्यामुळेच राज्याची प्रगती झाली आहे. यामुळे मी त्यांचा समर्थक आहे. असंही वैराग्यनंद यांनी म्हटले आहे.
भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. पण साध्वी ठाकूर आहेत आणि ठाकूर कधीही संत नसतात असे वैराग्यनंद यांनी म्हटले आहे. याआधी कम्प्युटर बाबा यांनी देखील दिग्विजय सिंह यांना समर्थन देण्याचे घोषित केले आहे. तसेच 7 ते 9 मे पर्यंत देशभरातील साधू संत दिग्विजय यांच्या विजयासाठी हठयोग करतील.